शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Android मोबाईलची battery life कशी वाढवाल



Android मोबाईलची आता खुप प्रचीती आली आहे, पण android मोबाईल ची battery चे आयुष्य हे खुप त्रायदायक ठरले आहे. कारण android मोबाईलची battery life अतीशय कमी असते. पण जर आपण खालील उपाय केले तर आपण निश्चितच मोबाईलची बॅटरी जास्त वेळ टिकवू शकतो.

खालील ठिकाणी  आपणांस  सुधारणा  करण्याची आवश्यक्ता आहे -

Display property:

तुमच्या मोबाईलीची स्क्रिन ही सर्वात जास्त बॅटरी वापरते आणि brightness जास्त असेल तर आणखीनच जास्त बॅटरी वापरली जाते. मोबाईल screen brightness  हे बॅटरीच्या आयुष्याशी निगडीत असते, म्हणूनच मोबाईलचा brightness कमीत कमी ठेवावा.

Screen timeout:

तसेच नेहमी लक्षात ठेवा कि, मोबाईल चा screen timeout हा कमीत कमी असावा. तो साधारणताः 30 सेकंद असावा, पण लक्षात असु दया कि हा screen timeout कधीही 10 मी. किंवा 30 मी. ठेवू नका. यानंतर तुमच्या लक्षात येईल कि, मोबाईलच्या बॅटरी चे आयुष्य वाढलेले आहे.

Connectivity:

जर GPS ची आवश्यक्ता नसेल तर तो बंद ठेवावा. तसेच Wi-Fi आणि Bluetooth देखील गरज असेल तेव्हाच on करावे, अन्यथा बंद करुन ठेवावे. असे लक्षात आले आहे कि, Wi-Fi मुळे battery life सर्वात जास्त वापरली जाते. म्हणून प्रवास करते वेळी Wi-Fi कधील on ठेवू नका, नाहीतर Wi-Fi सतत नेटवर्कचा शोध घेत राहिल.

Home Screen:

तुमच्या मोबाईलची Home screen हि battery life किती असेल हे ठरवते. तर तुम्हाला बॅटरीचे आयुष्य वाढवायचे असेल तर animated wallpaper बंद करावेत, तसेच Facebook आणि Twitter live feed widgets सूध्दा बंद करावेत.

Auto Sync:

जर तुम्हाला e-mail ची खुपच आवश्यक्ता असेल तर auto sync ठेवा, अन्यथा इतर वेळी बंद करुन ठेवावे. जर auto snyc on ठेवले असेल तर बॅटरी लाईफ खुप जास्त वापरली जाते. म्हणून र्इतर apps जसे Facebook, Twitter, Weather यांचे सुध्दा auto snyc बंद गरज नसेल तर करुन ठेवा.

Battery Use:

Android मध्ये मोबाईल मधील कोणत्या task बॅटरी लाईफ किती प्रमाणात वापरत आहे ते बघण्याची सुविधा आहे. याव्दारे कोणती task मोबाईलची बॅटरी सर्वात जास्त वापरत आहे, याचा आढावा घेऊ शकता.