शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

राष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते



आपण राष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते याची माहिती घेऊया.

राष्ट्रपतीपदासाठी पात्रता

३५ वर्षे वयाचा भारताचा नागरिक,केंद्रात किंवा राज्यात कोणत्याही फायद्याच्या पदाचा (office of profit) वापर केलेला व्यक्ती भारताचा राष्ट्रपती बनू शकतो पण त्यासाठी ५० सदस्यांनी(खासदार,आमदार)सूचक,अनुमोदक करणे गरजेचं आहे.

राष्ट्रपती पदासाठी उभे असणाऱ्या उमेदवारांना मतदान कोण करते ?

या पदासाठी दोन्ही संसदेचे खासदार आणि सर्व राज्यांचे विधान सभेचे (विधान परिषदेचे नाही) आमदार मतदान करतात.पण प्रत्येक राज्यातील आमदारांचे मतमूल्य (Value of Vote) वेगळे असते.

सदस्यांचे मतमूल्य कसे ठरवले जाते?

सदस्यांच्या मतांचे मूल्य राज्यघटनेच्या ५५() कलमानुसार ठरवले जाते.
सुरुवातीला आपण मतदान करणारे एकूण किती सदस्य असतात हे बघूया म्हणजे मतांचे मूल्य समजायला सोप्प जाईल.
लोकसभेचे ५४३ आणी राज्यसभेचे २३३ असे एकूण ७७६ खासदारांची संख्या आहे आणी सर्व राज्यातील (पोंडेचरी,दिल्लीसह) आमदारांची संख्या ४१२० आहे.
खासदार + आमदार = एकूण मतदार
७७६ + ४१२० = ४८९६
पाहिलं आमदारांचे मतमूल्य जाणून घेऊ.
राज्याची लोकसंख्या (आमदारांची लोकसंख्या × एक हजार )  =
 एका आमदाराचे मतमूल्य)

उदा.महाराष्ट्राची लोकसंख्या ,०४,१२,२३५ आहे.(१९७१ची घेतली जाते) आमदारांची एकूण संख्या २८८ आहे.इथे
२८८ X १००० = २८८००० या संख्येने एकूण लोकसंख्येला भागले असता १७५.०४२ हे उत्तर येते म्हणून  महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मताचे मूल्य १७५ आहे.म्हणजेच
आमदार × मतमूल्य = राज्यनिहाय मतदान
 (२८८ × १७५= ५०४००)
याचा अर्थ
 महाराष्ट्राचे मतदान ५०४०० एवढे आहे.
याच पद्धतीने प्रत्येक राज्यातील आमदाराच्या मताचे मूल्यमूल्य काढून राज्याचे एकूण मतदान ठरवले जाते.यात उत्तर प्रदेशच्या एका आमदाराचे मतमूल्य सगळ्यात जास्त म्हणजे २०८ आहे तर सिक्कीमच्या आमदाराचे सगळ्यात कमी म्हणजे आहे.
आता आपण खासदारांचे मतमूल्य कसे काढतात ते बघूया.
 (सर्व आमदारांचे मतमूल्य ÷ सर्व खासदार = खासदाराचे मतमूल्य)

भारतातील सर्व आमदारांचे मतमूल्य ५४९४७४ आहे.
५४९४७४ ÷ ७७६ = ७०८ म्हणजेच एका खासदाराचे मतमूल्य ७०८ इतके आहे.
आता खासदारांच्या संख्येला मतमूल्याने गुणले असता एकूण मतदान मिळेल.
 ७७६ × ७०८ = ५४९४०८

(आमदार मतमूल्य + खासदार मतमूल्य = एकूण मतदान)
 ५४९४७४ + ५४९४०८ = १०९८८८२

ज्या उमेदवाराला यातील ५०% मते पडतील तो राष्ट्रपती घोषित केला जातो.ही निवडणूक पदवीधर आमदार निवडणुकीसारखी असते जर उमेदवाराची संख्या जास्त असेल कोणालाच ५०% पेक्षा जास्त मते मिळाली नसतील तर सगळ्यात कमी मते मिळालेल्या उमेदवाराची मते दोन क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला वर्ग केली जातात.तरी आकडा गाठता आला नसेल तर खालून क्रमाक्रमाने उमेदवार बाद करत राष्ट्रपती घोषित करता येतो.

मी या निवडणुकीची पद्धत सोप्या पद्धतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.एक/दोन वेळा वाचल्यावर सहज समजेल.
जर ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका.